लता मंगेशकर ८० भाग ८

September 29, 2009 - Leave a Response

http://hindi-films-songs.com/khawar-100.html

७१. अल्लारखाँ कुरेशी – बदनसीबी का गिला (पहिलेच गाणे)

 

http://hindi-films-songs.com/khawar-002.html

७२. बी. एस. कल्ला – जीवनकी गाडी चलती है (वरून सहावे गाणे)

 

http://hindi-films-songs.com/khawar-005.html

७३. हाफिज खाँ – तुमसे हो गया प्यार (वरून तिसरे)

 

http://www.youtube.com/watch?v=C2a9_Aem5Og

७४. जतीन – ललित – हम को ही हमसे चुरा लो

 

http://www.youtube.com/watch?v=p5vvFxHbMa8

७५. कानू घोष – तुमसे दूर चले

 

http://www.youtube.com/user/kpm5886#play/search/8/QUZVE2-044c

७६. कल्याणजी वीरजी शहा – ये समां ये खुशी बोलो ना

 

http://www.youtube.com/watch?v=bqWFvBSkl5E

७७. सपन – जगमोहन – उल्फत में जमाने की हर रस्म को ठुकराओ

 

http://www.youtube.com/watch?v=UP5WP-UJgd4

७८. यशवंत देव – जीवनात ही घडी अशीच राहू दे

 

http://www.youtube.com/watch?v=JeIKWIB4u7w&feature=channel_page

७९. श्रीनिवास खळे – आनंदाचे डोही आनंद तरंग

 

http://hindi-films-songs.com/khawar-113.html

८०. मुकेश – जिसने प्यार किया उसका दुश्मन जमाना

लता मंगेशकर ८० भाग ७

September 29, 2009 - Leave a Response

http://www.youtube.com/watch?v=IBxFvYHuANs

६१. प्रेम धवन – जोगी हम तो लुट गये तेरे प्यारमें

 

http://www.youtube.com/watch?v=amRf_JYEyE4

६२. सोनिक ओमी – आजारे प्यार पुकारे

 

http://www.youtube.com/watch?v=zEWOyorO9FQ

६३. भुपेन हजारीका – दिल घुम घुम करे

 

http://www.youtube.com/watch?v=LIqV_8QkJRc

६४. के. महावीर – अहदे गममें भी मुस्कुराते

 

http://www.youtube.com/watch?v=zJuozVgMgY4

६५. राम लक्ष्मण – माई न माई

 

http://www.youtube.com/watch?v=2LuSDMJ6IyQ

६६. शिवहरी – देखा एक ख्वाब

 

http://www.youtube.com/watch?v=AXHRScX4J9A

६७. इक्बाल कुरेशी – आज मौसम की मस्ती में गाए पवन

 

http://www.youtube.com/watch?v=Y6sjiP4PF8g

६८. विजयसिंग (पटवर्धन) – इस दफा हम ना

 

http://www.youtube.com/watch?v=oMwsyxUThsw

६९. उत्तम सिंग – दिल तो पागल है

 

http://www.youtube.com/watch?v=HDQnrAHcSLo

७०. आनंद मिलिंद – मैंने तुझे खत लिखा

लता मंगेशकर ८० भाग ६

September 29, 2009 - Leave a Response

http://www.youtube.com/watch?v=r03aHhaEAH4

५१. उषा खन्ना – तुम अकेले तो कभी बाग में जाया न करो

 

http://www.youtube.com/watch?v=cQ6sTjW2-O8

५२. आदिनारायणराव – कुहू कुहू बोले कोयलिया

 

http://www.youtube.com/watch?v=1RbNkOpUHcI&feature=PlayList&p=3B18931A2F41C903&playnext=1&playnext_from=PL&index=33

५३. रामलाल – पंख होते तो उड आती रे

 

http://www.youtube.com/watch?v=n0tpgFQkah4

५४. दत्ताराम – प्यार भरी ये घटाएं

 

http://www.youtube.com/watch?v=GAUXqsaLYd0

५५. राहुलदेव बर्मन – घर आ जा घिर आयी

 

http://www.youtube.com/watch?v=sPyt4iseEKM

५६. लक्ष्मीकांत – प्यारेलाल – गुडीया हमसे रूठी रहोगी

 

http://www.youtube.com/watch?v=hu4JjZWsx24

५७. राजेश रोशन – ये रातें नयी पुरानी

 

http://www.youtube.com/watch?v=Q-29Nv95WdE&feature=channel_page

५८. ई. शंकर शास्त्री, बी. एस. कल्ला आणि पार्थसारथी – जिया लहर लहर लहराए

 

http://www.youtube.com/watch?v=xcCeTSGKdF4

५९. अविनाश व्यास – जा रे बादल जा

 

http://www.youtube.com/watch?v=Yda-bW8dZn0

६०. मैं हूं खुशरंग हीना

लता मंगेशकर ८० भाग ५

September 29, 2009 - Leave a Response

http://www.youtube.com/watch?v=MoN72HxeIEk

४१. सज्जाद हुसेन – दिल में समा गये सजन

 

http://www.youtube.com/watch?v=9cU5Ci7cg8I

४२. सरदार मलिक – हुई ये हम से नादानी

 

http://www.youtube.com/watch?v=bL1tpO7FEwE

४३. डी. दिलीप उर्फ दिलीप ढोलकिया – जा जा रे चंदा जा रे

 

http://www.youtube.com/watch?v=yoHQWxmbgg8

४४. परदेसी – चंदा रे मेरी पतिया ले जा

 

http://www.youtube.com/watch?v=i5mPokwWP1s

४५. आर. सुदर्शनम आणि धनीराम – मनमोर मचावे शोर

 

http://www.youtube.com/watch?v=6PUbSyL5BiA

४६. जी. एस. कोहली – तुम को पिया दिल दिया

 

http://www.youtube.com/watch?v=n9NYNwmU5So

४७. नाशाद उर्फ शौकत देहलवी – भुला नहीं देना जी

 

http://www.youtube.com/watch?v=t18jkg-RK4U

४८. बुलो सी. रानी – मांगनेसे जो मौत मिल जाती

 

http://www.youtube.com/watch?v=77-Bz0vzKz4

४९. एस. मोहिंदर – गुजरा हुआ जमाना

 

http://www.youtube.com/watch?v=hCfRYEokV5U

५०. रवी – ऐ मेरे दिले नादां

लता मंगेशकर ८०, भाग ४

September 29, 2009 - Leave a Response

http://hindi-films-songs.com/khawar-115.html

३१. व्ही. बलसारा – मोरे नैना सावन भादो तेरी रह रह याद सताए (वरून सहावे गाणे)

 

http://www.youtube.com/watch?v=m8-X44SUv48

३२. सलील चौधरी – आ जा री आ निंदिया तू आ

 

http://www.youtube.com/watch?v=GVCD_t-tVIk

३३. खय्याम – दिखायी दिये यूं

 

http://www.youtube.com/watch?v=THzYnuTFovQ

३४. के. दत्ता उर्फ दत्ता कोरगावकर – कैसे तुमबीन कटेगी उमरिया

 

http://www.youtube.com/watch?v=sd554_KrpgE

३५. हेमंतकुमार – कहां ले चले हो बता दो मुसाफिर

 

http://www.youtube.com/watch?v=8sBQt3coxjQ

३६. चित्रगुप्त – न तो दर्द गया न दवा ही मिली

 

http://www.youtube.com/watch?v=HArTEE5hat4

३७ लच्छीराम – ढलती जाये रात

 

http://www.youtube.com/watch?v=7zr32wr8w2E

३८. श्रीनाथ त्रिपाठी – प्यारा प्यारा ये समा

 

http://www.youtube.com/watch?v=hO4KmrDBWMs&feature=channel_page

३९. मन्ना डे – मेरे छोटेसे दिल को तोड चले

 

http://www.youtube.com/watch?v=P0e7AmIgtZc

४०. शिवरामकृष्ण – अपनी अदा पे मैं हूं फिदा

लता मंगेशकर ८० भाग ३

September 29, 2009 - Leave a Response

http://www.youtube.com/watch?v=UVntFoNSQws

२१. निस्सार बाजमी – बलमजी बडे नादान

 

http://www.youtube.com/watch?v=_R330Dzffvo

२२. गोबिंदराम – कारी कारी अंधियारी रात

 

http://www.youtube.com/watch?v=aHBrUOoMYDU

२३. जयदेव – ये नीर कहां से बरसे

 

http://www.youtube.com/watch?v=ujbZM6l4idw

२४. गुलाम मोहम्मद – चलते चलते

 

http://www.youtube.com/watch?v=ilYUtSBb6GY

२५. मोहम्मद शफी – बाजूबंद खुल खुल जाय

 

http://www.youtube.com/watch?v=RAlnnl7T9U8

२६. एन. दत्ता उर्फ दत्ता नाईक -मैं तुम्हीसे पूछती हूं

 

http://www.youtube.com/watch?v=2O6dZ2X9KZ8&feature=related

२७. वसंत देसाई – घडी घडी आले मनमोहना

 

http://www.youtube.com/watch?v=rQCfQ5V_Rjg&feature=channel_page

२८. वसंत प्रभू – आली हासत पहिली रात

 

http://www.youtube.com/watch?v=F8oSM-_XBqU&feature=channel_page

२९. हृदयनाथ – पसायदान

 

http://www.youtube.com/watch?v=zOU-QH4so8Y

३०. आनंदघन – अखेरचा हा तुला दंडवत

लता मंगेशकर ८० भाग २

September 29, 2009 - Leave a Response

http://hindi-films-songs.com/abhay-1.html

११. गुलाम हैदर – दिल मेरा तोडा (वरून तीसावे गाणे)

 

http://www.youtube.com/watch?v=5fTIsWeq-O8&feature=channel_page

१२. अनिल बिस्वास – मुख से न बोलूं अखियां न खोलूं

 

http://www.youtube.com/watch?v=fANjMNAPoLM

१३. खेमचंद प्रकाश – चंदा रे जा रे जा रे

 

http://www.youtube.com/watch?v=WcC7j9thWDk&feature=channel_page

१४. मदनमोहन – दुखियारे नैना ढूंढे पिया को

 

http://www.youtube.com/watch?v=B4U_fb48xeg

१५. हुस्नलाल भगतराम – खुशियोंके दिन मनाए जा

 

http://www.youtube.com/watch?v=QWBs0LVETWk

१६. सी. रामचंद्र – कटते है दुख में ये दिन

 

http://www.youtube.com/watch?v=EhUGCsFPkeM

१७. सचिनदेव बर्मन – फैली हुई है सपनोंकी बाहे

 

http://www.youtube.com/watch?v=3_oJLl6S7WI

१८. नौशाद – लो प्यार की हो गयी जीत

 

http://www.youtube.com/watch?v=nDNT_yx2sow

१९. शंकर – जयकिशन – कारे बदरा तू न जा न जा

 

http://www.youtube.com/watch?v=ugbgsy0J4nw&feature=channel_page

२०. रोशन – गरजत बरसत आईलो

 

१२ क्रमांकाचा अनिल बिस्वास यांचा दुवा न चालल्यास पर्यायी दुवा

http://www.youtube.com/watch?v=0Vxgwm2rrdg

१२. अनिल बिस्वास – बेईमान तोरे नैनवा

लता मंगेशकर ८०

September 29, 2009 - Leave a Response

आज २८ सप्टेंबर या दिवशी लता मंगेशकरच्या वयाला ८० वर्षे पूर्ण होतील. त्यानिमिताने ८० संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या ८० गाण्यांचे दुवे देऊन तिला शुभेच्छा द्याव्यात म्हणून ही लेखमाला लिहीत आहे. प्रत्येक भागात १० गाणी असे एकूण ८ भाग होतील. ही लेखमाला वाचण्यापेक्षा ऐकायची आहे. गीतकोश आणि जालावरच्या अनेक परिचित, अपरिचित मित्रांमुळेच हे शक्य झाले आहे. दुव्यावर पहिल्याने संगीतकाराचे नाव आणि त्यापुढे मुखड्याचे बोल दिले आहेत.

 

http://www.youtube.com/watch?v=8rngpr3t3V4

१. जमाल सेन – सपना बन साजन आये

 

http://www.youtube.com/watch?v=Uh8WsHWvBR8

२. अमरनाथ – जोगियासे प्रीत किये दुख होये

 

http://www.youtube.com/watch?v=gJ6WI1vI0lA

३. श्यामसुंदर – सुन लो सनज दिल की बात

 

http://www.youtube.com/watch?v=HmtSeNtEZZQ

४. विनोद – कागा रे

 

http://www.youtube.com/watch?v=rAg4QIvp8cA

५. शैलेश मुखर्जी – जल के दिल खाक हुआ

 

http://www.youtube.com/watch?v=ax4cRY5YXmE&feature=channel_page

६. रविशंकर – जाने काहे जिया मेरा डोले रे

 

http://www.youtube.com/watch?v=34Z7VHSnEKo

७. अली अकबर खान – है कहींपर शादमानी

 

http://www.youtube.com/watch?v=WYAspBwGmo4

८. मास्तर कृष्णराव – धुंद मधुमती रात रे

 

http://hindi-films-songs.com/khawar-004.html

९. जगमोहन सूरसागर – प्यार की ये तलखियाँ (वरून सातवे गाणे)

 

http://www.youtube.com/watch?v=IbJJOLFcDko

१०. सुधीर फडके – ज्योती कलश छलके

गीतकार शैलेंद्र

August 31, 2009 - Leave a Response

आज ३० ऑगस्ट. गीतकार शैलेंद्रची ८६वी जयंती. शैलेंद्र फक्त ४३ वर्षांचे आयुष्य जगला आणि या वर्षी १४ डिसेंबरला त्याचे निधन होऊन आणखी ४३ वर्षे होतील. त्यानिमित्ताने मला आवडलेल्या काही गाण्यांबद्दल अगदी थोडक्यात काही लिहावे असे वाटल्याने हा लेख. प्रा. माधव मोहोळकरांनी शैलेंद्रवर अप्रतिम लेख लिहिला आहेच. त्यामुळे त्यापेक्षा काही थोडेसे वेगळे सांगण्याचा प्रयत्न करेन.

“कवी होता कसा आनने?”अशी उत्सुकता सर्वांनाच असते. त्यासाठी चली कौनसे देश हे गीत ऐका आणि पहा. यामधला हाताने बुलबुलतरंग (की जलतरंग? ) वाजवीत तल्लीन होऊन गाणे म्हणणारा पुरूष म्हणजेच शैलेंद्र.

आता काही गाण्यांबद्दल लिहितो. राज कपूरच्या चित्रपटांसाठी शैलेंद्रने लिहिलेल्या गाण्यांबद्दल बरेच लिहिले गेले आहे त्यामानाने संगीतकार शंकर – जयकिशनबरोबरची इतर गाणी थोडीशी उपेक्षित राहिली. त्यापैकी मला सर्वात आवडणारी गाणी “बसंत बहार” चित्रपटातली. पहिले गाणे भयभंजना सुन हमारी . यातल्या “भयभंजना” शब्दाने लक्ष वेधून घेतले. दुसरे म्हणजे हे गाणे हे देवीची प्रार्थना आहे आणि त्याचे आपल्या “दुर्गे दुर्घट भारी” या देवीशी थोडेसे साम्य आहे. खासकरून दुसऱ्या कडव्यातल्या

“आजा मधुर स्वप्नसी मुस्कराती
मन के बुझे दीप हंसकर जलाती” या ओळींचे

“प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा
क्लेषापासूनी तोडी तोडी भवपाशा” या ओळींशी साम्य वाटते.

याच “बसंत बहार”मधले दुसरे गाणे आहे बडी देर भई. बऱ्याच वेळा शैलेंद्रच्या गाण्यांचे मुखडे साधे असतात पण खऱ्या चमकदार ओळी अंतऱ्यात असतात, उदा. “मेरा जूता है जापानी”सारख्या साध्या मुखड्याने सुरूवात होऊन हे गाणे
मुखड्यात “चलना जीवनकी कहानी रुकना मौत की निशानी” असे तत्त्वज्ञान सांगते. तीच स्थिती “बडी देर भई” या गाण्याची आहे. कडव्यामधल्या या ओळी बघा
“कहते है तुम हो दया हे सागर फिर क्यूं मेरी गागर
झूमे झुके कभी ना बरसे कैसे हो तुम “घन” श्याम”

दुसऱ्या ओळीत घनश्याम शब्दाची ”कधीही न बरसणारा घन असा श्याम” अशी फोड करून सुंदर श्लेष साधला आहे.

 शंकर – जयकिशन १९५० – ५५ या काळात अतिशय सुरेल गाणी द्यायचे त्याचा पुरावा म्हणजे “शिकस्त” चित्रपटातले कारे बदरा तू न जा हे लताने गायलेले अप्रतिम गीत. यातल्या मला विशेष आवडणाऱ्या ओळी तिसऱ्या कडव्यात आहेत.

“चौरस्तेपे जैसे मुसाफिर पथ पूछे घबराए
कौन देस  किस ओर जाऊँ मैं मन मेरा समझ न पाए”

खरे तर या लेखात राज कपूरच्या चित्रपटातली आणि अतिप्रसिद्ध गीते घ्यायची नाहीत असे ठरवले होते, तरीही ये रात भीगी भीगी या गाण्याचा अपवाद करावा लागला. कारण या गाण्यातल्या दुसऱ्या कडव्यातल्या अंतर्मुख करणाऱ्या पुढील ओळी

“जो दिन के उजाले में न मिला
दिल ढूंढे ऐसे सपने को
इक रात की जगमग में डूबी
मैं ढूंढ रही हूं अपनेको”

या ओळी ऐकल्यावर गीतकार गुलजारचे शब्द आठवतात “गीतकार शैलेंद्र ही अमच्या गीतकारांच्या दुनियेत घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट होती. चित्रपटगीतांना शैलेंद्रने साहित्याची उंची गाठून दिली.”

शंकर – जयकिशन यांच्यानंतर शैलेंद्रची जोडी जमली ती संगीतकार सलील चौधरींबरोबर. दोघांच्या शैलीत जमीन अस्मानाचा फरक होता. शंकर – जयकिशन गीताच्या नैसर्गिक चालीशी मिळतीजुळती, साधीसोपी चाल लावायचे. सलील चौधरी भारतीय संगीतावरोबरच अभिजात पाश्चात्य संगीताचे बेमालून मिश्रण करायचे. त्यांच्या बहुतेक सर्व चाली आधीच तयार असायच्या आणि त्यात त्यांनी (स्वतःच लिहिलेली) बंगाली गाणीही बांधलेली असायची. त्यामुळे अशा काटेकोर बांधलेल्या चालीत अक्षरश” “गाळलेल्या जागा भरा” प्रकारचे गाणे लिहायचे म्हणजे कमालीचे मुष्किल काम. त्यामुळे हे गाणे काव्य म्हणूनही सरस असावे अशी अपेक्षा करणे कठीण. अर्थात इतक्या मर्यादा पाळूनही शैलेंद्रने सुंदर गाणी लिहिली आहेत. त्यातले पहिले गाणे म्हणजे हरियाला सावन ढोल बजाता आया. यातल्या दुसऱ्या कडव्यात

“ऐसे बीज बिछो रे सुख चैन उगे दुख दर्द मिटे
नैनोंमें नाचे रे सपनोंका धान हरा”

अशा पसायदानाची आठवण करून देणाऱ्या ओळी लिहिल्या आहेत.

दुसरे  “परख” चित्रपटातले  मिला है किसी का झुमका हे गीत स्वतंत्र लेखाचा विषय आहे. बागेत गेलेल्या मुलीला तिच्या मैत्रिणीचा झुमका मिळतो. मैत्रीण प्रियकराबरोबर निघून गेली आहे, मुलगी आणि झुमका दोघांनाही मागे सोडून. त्यामुळे मुलगी स्वतःच्या मनातले विचार झुमक्याच्या माध्यमातून “सुनो क्या कहता है झुमका” म्हणून व्यक्त करते ते अतिशय तरल आहे.

अर्थात गाण्याचे चित्रीकरण अर्थाशी पूर्णपणे विसंगत आहे. झुमक्याऐवजी जास्वंदीचे फूल आहे, साधना मैत्रिणीच्या आठवणीने व्याकुळ दिसायच्या ऐवजी आनंदी दिसते आहे आणि चित्रपट पाहिलेल्यांकडून समजले की त्यात साधनाच्या मैत्रिणीचे (जिचा झुमका हरवतो) पात्रच नाही.

शैलेंद्र – सलील चौधरी जोडीचे माझे आणखी एक आवडते गाणे म्हणजे “हनीमून” चित्रपटातले मेरे ख्वाबोंमें खयालों में छिपे हे गीत. यातल्या पुढील ओळी बघा

“मेरे गीतोंके मचलते हुए स्वर
उनके आंगन में उतर
उनको मेरे पास खींच लाएंगे”

संगीतकार रोशन म्हटल्यावर गीतकार शैलेंद्रचे नाव सहसा समोर येत नाही. साहिर – मजरूहची नावे येतात. पण संगीतकार रोशनबरोबर सर्वाधिक १२ चित्रपटात गाणी लिहिली आहेत शैलेंद्रने. साहिरने ८ तर मजरूहने ६. रोशनने आपल्या संगीताची शैली तीन वेळा बदलली. १९४९ ते १९५५ वर्षे अत्यंत अभिजात, दर्जेदार संगीत दिले, १९५६ ते १९५९ मध्ये हलके फुलके संगीत दिले तर १९६० ते १९६८ साधारण मुसलमानी छापाचे म्हणजे गझला, कव्वाल्या, मुजरे याप्रकारचे संगीत दिले. तिन्ही टप्प्यात रोशनबरोबर शैलेंद्रने गाणी लिहिली आहेत.

त्यातले पहिले गाणे  “चांदनी चौक” मधले दिल की शिकायत नजर के शिकवे. रोशनकडे अनेक वेळा “हेही आहे आणि तेही आहे” किंवा हेही कठीण तेही कठीण” अशा अर्थाची गाणी दिसतात. तीन गाणी सहज आठवतात. एक “अनहोनी” मधले “दिल शाद भी है नाशाद भी है” दुसरे “नौबहार” मधले शैलेंद्रनेच लिहिलेले “उनके बुलावेसे डोले मेरा दिले जाऊँ तो मुष्किल न जाऊँ तो मुष्किल” आणि तिसरे वर दिलेल शैलेंद्रचेच “दिल की शिकायत नजर के शिकवे एक जुबाँ और लाख बयाँ छिपा सकूं ना दिखा सकूं दिल के दर्द मेरे हुए जवां”. यातल्या मला खास  आवडणाऱ्या ओळी तिसऱ्या कडव्यात आहेत.

थोडे लिखे को बहुत समझना नये नहीं ये अफसाने
दिल मजबूर भरा आता है छलक उठे है पैमाने
खत में जहाँ आँसू टपका है लिहा है मैंने प्यार वहाँ

तसेच “संस्कार” चित्रपटातली हँसे टिम टिम टिम छोटे छोटे तारे ही लोरीही माझी फार आवडती आहे.

शैलेंद्रने अनेक लोकगीते आणि त्यांच्यावर आधारित गीते लिहिली. लोकगीतावर आधारित एक प्रसिद्ध गीत म्हणजे “बंदिनी” चित्रपटाले अब के बरस भेज भय्या को बाबुल. या गाण्याच्या बाबतीत एक किस्सा खूप वर्षांपूर्वी “कोहिनूर गीतगुंजार” या कार्यक्रमात अजित सेठ यांनी सांगितला होता. एका प्रेम नावाच्या माणसाकडून त्यांना समजला होता. प्रेम (धवन? ) म्हणाले “एक दिवस मी आणि गीतकार शैलेंद्र पोवई उद्यानात फिरायला गेलो. एका झाडाखाली बसलो आणि मी माझ्या भसाड्या आवाजात एक लोकगीत ऐकवले. ते ऐकून शैलेंद्रच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. पुढे अनेक दिवसांनी शैलेंद्रच्या घरी गेलो तर त्याच्या टेबलावर त्या लोकगीतावर आधारित गीत लिहिलेले दिसले. त्यावेळी ‘तीसरी कसम” ची तयारी जोरात चालू होती त्यामुळे ते “तीसरी कसम” साठी असावे असा माझा समज होता पण ते पुढे ‘बंदिनी’ चित्रपटात आले. “

१९६२ मध्ये पहिला भोजपुरी चित्रपट निघाला “गंगा मैया तोहे पियरी चढइबो” त्यातली गाणी शैलेंद्रने लिहिली होती आणि संगीतकार होते चित्रगुप्त. त्यातली दोन गाणी फार प्रसिद्ध झाली. पहिले हे गंगा मैया तोहे पियरी चढइबो. यामध्ये लग्नानंतर नवऱ्याला कसे सामोरे जायचे, आपल्याजवळ रूप, गुण, कर्तृत्व, दागिने काहीच नाही अशी खंत मुलीने व्यक्त केली आहे.

“ना मेरे गुण ढंग ना मेरे करनी ना मेरे एको गहनवा हो राम
खोले घुंघट जब पिया मोको देखी है कर बैनी कौनो बहनवा हो राम”

यातले “बहनवा” चा संबंध “बहन” शब्दाशी नसून “बहाना” शब्दाशी आहे हे समजायला थोडा वेळ लागला. अर्थात् हे गाणे मूळ शैलेंद्रचे आहे की नाही याबद्दल शंका आहे, कारण याच गाण्याची सोप्या हिंदीतली आवृत्ती  बेगम अख्तरच्या आवाजही ऐकली आहे आणि त्यावेळी तिचा उल्लेख “पारंपरिक रचना” असा केला होता. याच चित्रपटाले दुसरे बिदाईगीत सोनवा के पिंजरा में बंद भईल हाय राम हे ही अतिशय सुरेख आहे.

संगीतकार अनिल बिस्वास यांच्याबरोबर गीतकार शैलेंद्रने “सौतेला भाई” आणि अगदी शेवटचा “छोटी छोटी बाते” या दोनच चित्रपटात गीते लिहिली. त्यापैकी “छोटी छोटी बातें” मधले कुछ और जमाना कहता है हे माझे अतिशय आवडते.

“ये बस्ती है इन्सानोंकी इन्सान मगर भूले ना मिला
पत्थत की बुतों से क्या कीजे फरियाद भला टूटे दिल की”

या मला विशेष भावलेल्या ओळी. या गाण्याबाबत एक जाणावणारी गोष्ट म्हणजे कमालीचा कडवटपणा जो यापूर्वीच्या गाण्यांमध्ये कधीही दिसला नाही. “तीसरी कसम” तयार करताना झालेला मनस्ताप आणि या गाण्यातला कडवटपणा याचा काही संबंध आहे का समजत नाही.

गाण्यातून एखादी गोष्ट (कथा या अर्थाने) सांगणे हेही शैलेंद्रने अनेक वेळा केले आहे त्यातले दिल का हाल सुने दिलवाला हे विशेष. भुरट्या चोरासारखे दिसणाऱ्या तरूणाला पोलीस पकडून नेतात, तिथे दरोगासाहेब त्याला “ठानेदार का साला” असल्याचे ओळखून सोडून देतात अशी साधी गोष्ट पण बरीच खुलवून सांगितली आहेत.

 त्यातल्या स्वतःबद्दलच्या

“छोटेसे घर में गरीब का बेटा मैं भी हूं मां के नसीब का बेटा
रंजो गम बचपन के साथी आंधियों में जले जीवनबाती
भूख ने है बडे प्यार से पाला”

या ओळी तर आवडल्याच पण

“सुनो मगर ये किसी न कहना तिनके का लेके सहारा ना बहना
बेमौसम मल्हार ना गाना आधी रात को मत चिल्लाना
वरना पकड लेगा पुलिसवाला”

असा थोडासा मजेशीर समारोपही आवडला. 

लहान मुलांकरता गाणी लिहिणे सोपे नाही असे एकदा गुलजार म्हणाले होते. शैलेंद्रने लिहिलेले नानी तेरी मोरनी हे गाणे अजूनही लोकप्रिय आहे. त्यातल्या या ओळी पहा.

“खाके पीके मोटे होके चोर बैठे रेलमें
चोरोंवाला डब्बा कटके सीधा पहुंचा जेल में”

आयुष्यात अनेक वेळा दुःखाचे, निराशेचे प्रसंग येतात. अनेक वेळा आपल्याला कोणी मित्र नाही आपण असहाय्य आहोत अशे भावना होते अशा वेळी शैलेंद्रच्या गाण्यांचा आधार वाटतो. उदा. मैं आशिक हूं बहारोंका या गाण्यातल्या

चला गर सफर को कोई बेसहारा
तो मैं हो लिया संग लिये एकतारा
गाता हुआ दुख भुलाता हुआ

या ओळी, किंवा दो दिन की जिंदगी में या गाण्यातल्या

मरनेको सौ बहाने जीनेको सिर्फ एक
उम्मीदके सुरोंमें बजते है दिल के तार

या ओळी. कमी शब्दात प्रभावीपणे विचार व्यक्त करण्याची शैलेंद्रची ताकद साधारण असाच विचार सांगणाऱ्या साहिरच्या

“मौत कभीभी मिल सकती है ये जीवन फिर न मिलेगा
मरनेवाले सोच समझ ले तुझ को ये पल फिर न मिलेगा”

या “रात भर का है मेहमां अंधेरा” या गाण्याच्या सुरूवातीच्या ओळींशी केली तर लक्षात येते.

माझ्या यादीतले  गाणे वहाँ कौन है तेरा. बर्मनदादांच्या आवाजाच्या माध्यमातून शैलेंद्र अजूनही आपल्या संपर्कात आहे असे वाटते. कदाचित हे सगळे स्वप्नाळू भास आहेत असेही कोणी म्हणेल.

गीतकार शैलेंद्रच्या ३२ कवितांचा संग्रह “न्यौता और चुनौती” १९५५ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातल्या १६ कविता हिंदी कविता जालावर (कविताकोश डॉट ऑर्ग) इथे वाचता येतात त्याही शैलेंद्रच्या कवित्वशक्तीची साक्ष देणाऱ्या आहेत.

विनायक

 

 

 

 

 
 

कवी आणि संगीतकार – ५

September 25, 2008 - 2 Responses

मागल्या भागात लिहिल्याप्रमाणे या भागात संगीतकार जयदेवच्या गाण्यांचा विचार करू. संगीतकार जयदेव यांनी एका मुलाखतीत सांगितले होते “गाने में अगर कविता न हो तो वो सिर्फ एक चीज या खयाल बन जाता है और फिर उसका कुछ मतलब नहीं है” आणि खरोखर त्यांच्या संगीतामध्ये – चित्रपटात आणि गैरफिल्मी – कवितेचा प्रभाव चांगलाच दिसून येतो. संगीतकार जयदेव यांची गाणी ऐकल्याने अनेक नवीन कवींची ओळख झाली.

जयदेव खऱ्या अर्थाने दुर्दैवी संगीतकार म्हणता येतील कारण त्यांना संधी कमीच मिळाल्या. १९५५ मधल्या “जोरू का भाई” पासून सुरुवात केली तरी १९५५ ते १९७० या प्रदीर्घ काळात जोरू का भाई (गीतकार – साहिर, नरेंद्र शर्मा, विश्वामित्र आदिल), अंजलि(गीतकार – न्याय शर्मा) आणि समुंदरी डाकू(गीतकार – विश्वामित्र आदिल), हम दोनो (साहिर), मुझे जीने दो (साहिर), किनारे किनारे (न्याय शर्मा) आणि  ”हमारे गम से मत खेलो” अशा फक्त सात चित्रपटांना संगीत द्यायची संधी मिळाली. “जोरू का भाई” साहिरने लिहिलेली “सुबह का इंतजार कौन करें ” या गाण्याची तलत आणि लता यांनी गायलेली टॅंडेम व्हर्जन्स सुरेख आहेत. तीच गोष्ट  ”समुंदरी डाकू” मधल्या “दिल जवाँ है आरजू जवाँ” या विश्वामित्र आदिल यांनी लिहिलेल्या तलत आणि तलत- आशा यांनी गायलेल्या गाण्याच्या टँडेम व्हर्जन्सची.

 गीतकार न्याय शर्मांनी “अंजली” चित्रपटाद्वारे पदार्पण केले. त्यातले “किस किस को दीपक प्यार करे” हे एकच गीत मी ऐकले आहे. मात्र “किनारे किनारे” मध्ये त्यांनी “जब गमे इश्क सताता है तो हँस देता हूँ (मुकेश), “चले जा रहे है मुहब्बत के मारे किनारे किनारे” (मन्ना डे), “देख ली तेरी खुदाई बस मेरा जी भर गया” (तलत) आणि “हर आस अष्कबार है हर साँस बेकरार है” (लता) अशी एकाहून एक सरस गीते लिहिली आहेत. त्यानंतर “रेश्मा और शेरा” मधले अतिप्रसिद्ध अशा “तू चंदा मैं चाँदनी” या गाण्यामुळे गीतकार “बालकवी बैरागी” नावाचे एक चांगले कवी आहेत हे समजले. “प्रेम पर्बत” मधले जाँ निसार अख्तर यांनी लिहिलेले “ये दिल और उनकी निगाहोंके साये” हे गाणे किती सुरेख आहे हे ज्यांनी ऐकले आहे त्यांना वेगळे सांगायला नको. पहाडी धुन, संतूर, बासरी आणि जाँ निसारचे ”पहाडोंको चंचल किरन चूमती है, हवा हर नदी का बदन चूमती है….. लिपटते ये पेडोंसे बादल घनेरे, ये पल पल उजाले ये पल पल अंधेरे.. ” यासारखे चित्रदर्शी शब्द  यातून एखाद्या हिल स्टेशनवरचा सूर्योदय जणू काय आपल्या नजरेसमोर उलगडतोय असा भास होतो. याच चित्रपटात सुप्रसिद्ध कवयित्री पद्मा सचदेव यांनी दोन गाणी लिहिली आहेत. “ये नीर कहाँ से बरसे बदरी कहाँसे आयी है” आणि “मेरा छोटासा देखो ये संसार है” ही लताने गायलेली गाणीही सुरेख आहेत. “परिणय”मधले शर्मा बंधूंनी गायलेले “सूरज की गर्मी से तपते हुए तन को मिल जाये तरूवर की छाया” हे गीतही प्रसिद्ध आहे(गीतकार – रामानंद शर्मा).  ”दिन खाली खाली बर्तन है रात है जैसे अंधा कुँआ इन सूनी अंधेरी आंखोंमें आँसूकी जगह आता है धुआँ” हे गुलजार यांचे घरौंदा मधल्या “एक अकेला इस शहर में” या गाण्यातले शब्द कोण विसरेल? “कोई गाता मैं सो जाता” ही हरिवंशराय बचचन यांची संस्कृतप्रचुर हिंदीतली येसूदासने गायलेली रचनाही मला आवडते. “क्या कोई नयी बात नजर आती है हम में आईना हमें देख के हैरान सा क्यूं है? ” असा प्रश्न”सीनेमें जलन आँखोंमें तूफान सा क्यूँ है”  या गाण्यातून शहरयार यांनी विचारला आहे.  अलिगढ मुस्लिम विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या शहरयार यांनी  “गमन” मध्ये पहिल्याने गीते लिहिली. मखदूम मोहिउद्दिन हे जरी लैकिकार्थाने गीतकार नसले तरी त्यांच्या अनेक रचना चित्रपटात गीते म्हणून आल्या आहेत. “दो बदन प्यार की आग मे जल गये” (चा चा चा – रफी – आशा), “जानेवाले सिपाहीसे पूछो वो कहाँ जा राहा है” (उसने कहा था – मन्ना डे), “फिर छिडी बात बात फूलोंकी” (बाज़ार) ही गाणी प्रसिद्ध आहेत तसेच “गमन” मधले “रातभर आपकी याद आती रही” हे छाया गांगुलीने गायलेले गाणेही माझे अतिशय आवडते आहे. याशिवाय आणखी एका कवीबद्दल लिहिले नाही तर हा लेख अपूर्ण राहील. तो म्हणजे सुदर्शन फाकीर. “दूरियाँ” या एकाच चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिली आहेत. बाकी त्यांची गैरफिल्मी गाणी – खास करून जगजीत सिंगने गायलेले “ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो” तसेच बेगम अख्तरने गायलेली गाणी जास्त प्रसिद्ध आहेत. पण “दूरियाँ”मधले “जिंदगी मेरे घर आना” हे माझे अतिशय म्हणजे अतिशयच आवडते गीत आहे. सर्वच गीत टंकायचा मोह मुष्किलीने आवरून एकच कडवे इथे देतो.

मेरे घर का सीधासा इतना पता है
मेरा घर जो है चारो तरफ से खुला है
न दस्तक जरूरी न आवाज देना
मेरे घर का दरवाजा कोई नहीं है
है दीवारें गुम और छत भी नहीं है
कडी धूप है तो २
तेरे आँचल का साया चुराके जीना है जीना ज़िंदगी
मेरे घर आना ज़िंदगी

अनेक संतकवींच्या रचनाही जयदेवने लता, आशा, भीमसेन जोशी अशा लोकांकडून गाऊन घेऊन अजरामर केल्या आहे. “कौनो ठगवा नगरिया लूटल हो” (कबीर – आशा – अनकही), रघुवर तुमको मेरी लाज (तुलसीदास – भीमसेन – अनकही), हरी आओ हरी आओ (सूरदास – भीमसेन – अनकही), मैं जानू नाही (मीराबाई – लता – चांदग्रहण).

चित्रपटसंगीताव्यतिरिक्त जयदेव यांनी हिंदी- उर्दूमधील प्रसिद्ध रचना आशा भोसलेकडून गाऊन घेतल्या आहेत. “निराला”, महादेवी वर्मा, नरेंद्र शर्मा तसेच गालिब, वगैरे कवी शायरांच्या रचना त्यात आहेत. त्यातले “मन तुमुल कोलाहल कलय में मैं हृदय की बात रे” हे गाणे ऐकणे हा “आऊट ओफ वर्ल्ड” अनुभव आहे.

एखादे व्रत घेतल्यासारखा आयुष्यभर चांगल्या कवितांवर आधारित गाणी देणारा जयदेव ५ जानेवारी १९८७ ला गेला. अनेक तरूण मित्रमैत्रिणी मला विचारतात “काका तुम्हाला नवीन गाणी आवडतच नाहीत का? ” मी त्यांना सांगतो “माझ्यासाठी चांगले संगीत ५ जानेवारी १९८७ ला संपले.”